लोकैर्मत्सरिभिर्गुणा वनभुवो व्यालैर्नृपा
दुर्जनैरस्थैर्येण विपत्तयोऽप्युपहता ग्रस्तं न किं केन वा ||
अर्थ
आयुष्यावर मृत्युनी आक्रमण केलाय [संपवतो] बेफाम [जोश असणार] तारुण्य
म्हातारपणानी संपत. संपत्तीच्या हव्यासानि समाधान नाहीस होत.नखऱ्यांकडे
लक्ष जाऊन शांती मावळते. मत्सर करणाऱ्या लोकांमुळे गुणांच चीज होत नाही. अरण्यावर सापांच आक्रमण होतं. दुष्ट लोक राजांवर प्रभुत्व मिळवतात. संकटावर
अस्थैर्याचे आक्रमण होत. [एकूण काय] कुठलीही गोष्ट कशानितरी संपतेच. [सर्व
स्थितींना नाश आहे.]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Tuesday, November 25, 2014
Thursday, November 20, 2014
१३६९. श्रुतिः शिथिलतां गता स्मृतिरपि प्रनाष्टाधुना गतिर्विषयमागता विगलिता द्विजानां ततिः |
गवामपि च संहतिः समुचितक्रियातश्च्युता कृता नु जरया तया
कलियुगस्य साधर्म्यता ||
अर्थ
श्रुति [कान आणि वेदांच ज्ञान] मंदावल आहे; आता स्मृति [ते ग्रंथ आणि आठवण] नाश पावली आहे; गति [परलोक आणि चालणं] विषय [ऐहिक इच्छा किंवा जरुरी] एवढीच राहिली आहे; द्विजांची [ज्ञानी माणसे किंवा दात] रांग नाहीशी झालीय; गो [इंद्रिय आणि गाई] चा समुदाय त्याचं काम करत नाहीये, खरोखर म्हातारपण अगदी कलियुगासारख वागतंय!
अर्थ
श्रुति [कान आणि वेदांच ज्ञान] मंदावल आहे; आता स्मृति [ते ग्रंथ आणि आठवण] नाश पावली आहे; गति [परलोक आणि चालणं] विषय [ऐहिक इच्छा किंवा जरुरी] एवढीच राहिली आहे; द्विजांची [ज्ञानी माणसे किंवा दात] रांग नाहीशी झालीय; गो [इंद्रिय आणि गाई] चा समुदाय त्याचं काम करत नाहीये, खरोखर म्हातारपण अगदी कलियुगासारख वागतंय!
Friday, November 14, 2014
१३६८. आलस्यं स्थिरतामुपैति भजते चापल्यमुद्योगितां मूकत्वं मितभाषितां वितनुते मौढ्यं भवेदार्जवम् |
पात्रापात्रविचारणाविरहिता यच्छत्युदारात्मतां
मातर्लक्ष्मि तव प्रसादवशतो दोषा अमी स्युर्गुणाः ||
अर्थ
अहो आईसाहेब लक्ष्मीदेवी; आपल्या कृपाप्रसादाने [ज्यांच्या घरी आपण वास्तव्य करता त्यांचा] आळशीपणाला स्थैर्य असा मान मिळतो; [घिसाड] घाई उद्योगीपणा होतो; बोलता न येणं मितभाषी असं नाव मिळवत; मूर्खपणा सरलता बनते आणि [दुसऱ्याची] पात्रता न समजणं म्हणजे 'तो उदार आहे' असा सन्मान मिळवून देत.
अर्थ
अहो आईसाहेब लक्ष्मीदेवी; आपल्या कृपाप्रसादाने [ज्यांच्या घरी आपण वास्तव्य करता त्यांचा] आळशीपणाला स्थैर्य असा मान मिळतो; [घिसाड] घाई उद्योगीपणा होतो; बोलता न येणं मितभाषी असं नाव मिळवत; मूर्खपणा सरलता बनते आणि [दुसऱ्याची] पात्रता न समजणं म्हणजे 'तो उदार आहे' असा सन्मान मिळवून देत.
Wednesday, November 5, 2014
१३६७. यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मिश्रितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
अर्थ
या किंवा त्या कुठल्यातरी झाडाच मूळ [घेऊन] त्यात हे नाहीतर ते मिसळलं [आणि औषध म्हणून] कुणाला पण दिलं [तर काय होणार? आजारी] असा [बरा] किंवा तसा [अजून खराब] होईल. [नीट निदान; योग्य औषध; त्याची प्रकृती पाहून उपाय योजना केली तर फायद्याची होते. कुठल्याही परिस्थितीत विचारपूर्वक उपाययोजना हवी.]
अर्थ
या किंवा त्या कुठल्यातरी झाडाच मूळ [घेऊन] त्यात हे नाहीतर ते मिसळलं [आणि औषध म्हणून] कुणाला पण दिलं [तर काय होणार? आजारी] असा [बरा] किंवा तसा [अजून खराब] होईल. [नीट निदान; योग्य औषध; त्याची प्रकृती पाहून उपाय योजना केली तर फायद्याची होते. कुठल्याही परिस्थितीत विचारपूर्वक उपाययोजना हवी.]
Tuesday, November 4, 2014
१३६६. म्रियामाणं मृतं बन्धुं शोचन्ते परिदेविनः |
आत्मानं नानुशोचन्ति कालेन कवलीकृतम् ||
अर्थ
शोक करणारे [नातेवाईक] मरणपंथाला निघालेल्या बद्दल; मृत व्यक्तींबद्दल शोक करतात [पण] आपण सुद्धा काळाच्या घशात चाललोय याच ते दुःख करत नाहीत. [आपला पण मृत्यु जवळ येतोय हे कुणाच्या लक्षातच येत नाही.]
Monday, November 3, 2014
१३६५. भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिसृतम् |
गीतागङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते ||
अर्थ
महाभारताचं सारसर्वस्व; जे स्वतः भगवान विष्णूच्या मुखातून बाहेर पडलं आहे, ते गीता रूपी गंगेच तीर्थ प्यायल्यावर [शिकून घेतल्यावर] पुनर्जन्म येणारच नाही. [मोक्ष मिळेल.]
अर्थ
महाभारताचं सारसर्वस्व; जे स्वतः भगवान विष्णूच्या मुखातून बाहेर पडलं आहे, ते गीता रूपी गंगेच तीर्थ प्यायल्यावर [शिकून घेतल्यावर] पुनर्जन्म येणारच नाही. [मोक्ष मिळेल.]
Sunday, November 2, 2014
१३६४. अप्युन्नतपदारूढः पूज्यानैवापमानयेत् |
नहुषो शक्रतां प्राप्य च्युतोऽगस्त्यावमाननात् ||
अर्थ
जरी [कोणताही माणूस] फार मोठ्या अधिकाराच्या जागेवर असला तरी त्याने आदरणीय व्यक्तींचा अपमान करू नये. इंद्रपद मिळालं असूनही अगस्त्य ऋषींचा अपमान केल्यामुळे ते पद त्याला गमवावं लागलं.
अर्थ
जरी [कोणताही माणूस] फार मोठ्या अधिकाराच्या जागेवर असला तरी त्याने आदरणीय व्यक्तींचा अपमान करू नये. इंद्रपद मिळालं असूनही अगस्त्य ऋषींचा अपमान केल्यामुळे ते पद त्याला गमवावं लागलं.
Subscribe to:
Posts (Atom)